Shoponix
Shoponix
Home
Women
Clothing
Gifts
Hair and Skin care
Home Furnishing
Jewelry
Kids
Gifts
Kids Accessories
Home and Living
Clothing
Food
Gifts
Home Decor
Home Furnishing
Services
My Profile
☰
Author Name:Radhika Awekar
Pandharichi Vaari
How to celebrate
वारी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली अभूतपूर्व परंपरा जी वर्षानुवर्षे अविरत अगदी नियोजन बद्द सुरू आहे वारी मधील management हा एक स्वतंत्र विषय होईल अशी ही वारी अवघा रंग एक झाला म्हणत सर्व जातीधर्माचे, वयाचे , रंगाचे, वर्णाचे, वेगवेगळ्या संस्कृतीला एकत्र बांधण्याचे काम करत वारीत स्त्री पुरुष असाही भेद नसून प्रत्येकाला तो लहान असो वा मोठा फक्त माऊली या नावाने हाक मारली जाते अशी ही महाराष्ट्राची च नव्हे तर आपल्या देशाची शान संस्कृती विषयी लिहायचे म्हटल्यास एक ग्रंथ होईल म्हणून थोडक्यात वेगवेगळ्या संदर्भाचा अभ्यास करून सोप्या शब्दात लिहण्याचा प्रयत्न केलाय?
Story behind it
👉वारी म्हणजे काय :- दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशी ला वेगवेगळ्या भागातील संतांच्या पादुका या पालखित ठेवून त्या सोबत सर्व वारकरी पायी प्रवास करतात ही पदयात्रा ह्या वेगवेगळ्या भागातून जात श्री क्षेत्र पंढरपूर येथील -विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भेट घेतात सर्वप्रथम पंढरपूर मध्ये असलेल्या चंद्रभागा तीरावर पादुका , वारकरी, स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.
👍वारीचा मार्ग - वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या या निघतात जसे की गजानन महाराज ची पालखी शेगाव बुलढाणा जिल्हा इथून तर देहू , आळंदी इथून संत तुकाराम, ज्ञानेश्वर अश्या वेगवेगळ्या पालख्या निघतात साधारण आषाढी आणि कार्तिकी एकादशी च्या महिना भर आधी वारी च्या मार्गक्रमण तारखा ह्या ठरलेल्या असतात त्यानुसार वारीच्या मार्गात असणाऱ्या वेगवेगळ्या गावात त्या त्या दिवशी वेगवेगळ्या संतांच्या पालख्या येतात अगदी जलोष्यात स्वागत होत वेगवेगळ्या मुक्काम करत पालख्या पुढे जातात. आळंदी वरून निघणाऱ्या पालख्या चे मार्गक्रमण वर्णन करायचे म्हटल्यास भोसरी, वाकडेवाडी वरून भवानी पेठ पुणे इथे रात्रीचा मुक्काम होतो यावेळी भजन, कीर्तन, भारुड ,अभंग यात वारकरी तल्लीन असतो पुढे जात उरुळी देवाची करत सासवड इथे मुक्काम करत संत सोपानदेव पालखी सासवड वरून सहभागी होते, जेजुरी, दौड, लोणंद, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस वाखरी आणि पंढरपूर असा मुक्काम करत आणि या गावाच्या मध्ये येणाऱ्या सर्व लहान मोठ्या गावातून प्रवास करत पंढरपूर ला विठुरायाच्या भेटीला जातात.🙏
👍वारीमधील परंपरा जपणारे सोहळे - वारी मार्गक्रमण होताना वेगवेगळ्या भागात अगदी भक्ती भावाने स्वागत केले जाते या दरम्यान पालख्या मध्ये असलेल्या पादुकाची नित्य नेमाने आरती नेवैद्य ही होतो भजन कीर्तन या सर्वात अगदी भक्तिमय वातावरणात हा प्रवास सुरु असतो यामध्ये गोल रिगण ही असत अस हे पाहिले रिगण चांदोबच लिब इथे लोणंद जवळ पाहिले रिगण होत, दुसरे खुडूस फाटा इथे ही गोल रिगण होत यामध्ये गोल करून 'मानाचा घोडा, गोल रिगण घालतो असे रिगण भडीशेगाव जवळ बाजीराव विहिरी जवळ आणि वाखरी ला ही असे रिगण होते तसे च वेगवेगळ्या संतांचा पादुका जेव्हां वेगवेगळ्या भागातून जेंव्हा एकेठिकाणी येतात त्यावेळी त्याचा भेटीचा ही एक विलक्षण सोहळा होतो यासोबतच असंही म्हणतात संत तुकाराम महाराजांना वेळापूर ला असताना पंढरपूर देवळाचा कळस दिसलेला त्यावेळी त्यांनी धावत जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले ती परंपरा कायम ठेवत वेळापूर येथे पालखी आली की वारकरी धावा करतात तो ही एक विलक्षण असा सोहळा असतो
असा हा एक आपल्या महाराष्ट्र ची नव्हे तर देशाची संस्कृती, परंपरा असलेला आणि अविरत सुरू असलेला सोहळा खूप मोठी शिकवण देतो, माणसाला एकत्र बांधतो, वारी च management थक्क करणार आहे परदेशातूनही लोक यावर अभ्यास करण्यासाठी वारीत सहभागी होतात. एवढा पायी प्रवास करूनही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर च तेज ही अजूनच वाढले ले दिसते एक जोश उत्साह एक अभूतपूर्व वातावरण.
आयुष्यात प्रत्यक्ष एकदा तरी वारी अनुभवावी हीच विठ्ठलचरणी प्रार्थना🙏☺️